“अत्याचारी गावांतील” “दलितांचे धरणग्रस्तासारखे””नजीकच्या शहरांमध्ये पुनर्वसन करा!”

“अत्याचारी गावांतील” “दलितांचे धरणग्रस्तासारखे””नजीकच्या शहरांमध्ये पुनर्वसन करा!” ■उद्धव ठाकरे यांच्याकडे आंबेडकरी लोक संग्रामची मागणी■
=================


मुंबई, दि,८ मे २०२०: हिंसक अत्याचार घडणाऱ्या गावांतील दलित,बौद्ध आणि तत्सम अनुसूचित जातीच्या सर्वच कुटुंबांचे स्थलांतर करावे. त्यांचे नजीकच्या शहरात प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या १९९९ च्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे धरणग्रस्ताच्या धर्तीवर सामाजिक न्याय खात्यामार्फत पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘आंबेडकरी लोक संग्राम’ या संघटनेने केली आहे.

या संदर्भातील धोरणात्मक निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी घ्यावा, असा आग्रह मुखमंत्र्याना आज पाठवलेल्या एका विस्तृत निवेदनाद्वारे धरला आहे.

नागपूर जिल्ह्यातील थडी पवनी ( तालुका : नरखेड) या गावात अरविंद बन्सोड या बौद्ध तरुणाचा बेदम मारहाणीनंतर संशयास्पदरित्या मृत्य झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मिथिलेश उर्फ मयूर बंडू उमरकर हा मेंढला पंचायत समितीचा सदस्य आहे. त्याची आई ही बौद्ध तरुणाला मारहाण झालेल्या थडी पवनी या गावातील सरपंच आहे. तर, मिथिलेशचे वडील बंडू उमरकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वजनदार नेते आहेत.

या प्रकरणावरून राज्यातील बौद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आंबेडकरी लोक संग्रामने निवेदन धाडले आहे. त्यात अरविंद बन्सोड याच्याकुटुंबासह थडी पवनी गावातील दलित कुटुंबांचे नागपूर येथे सामूहिक स्थलांतर करून त्यांचे प्रकल्पग्रस्ताच्या धर्तीवर पुनर्वसन करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.


अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूच्या तपासासाठी विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली खास तपास पथक स्थापन करावे. तसेच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असलेला बन्सोड याचा मित्र गजानन राऊत याला त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

नागपूर ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात
************************
1) नागपूर जिल्ह्यातील पिंपळदरा या गावातील (तालुका : नरखेड) अरविंद बन्सोड (३०वर्षे) या बौद्ध तरुणाला मेंढला पंचायत समितीचा सदस्य असलेल्या मिथिलेश उर्फ मयूर बंडू उमरकर याने आणि त्याच्या साथीदारांनी दिनांक २७ मे २०२० रोजी झालेल्या बेदम मारहाण केली. त्यानंतर बन्सोड याचा संशयास्पदरित्या दोन दिवसांनी २९ मे रोजी रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. ही घटना थडी पवनी या गावात घडली आहे.

2) या प्रकरणात मयत बौद्ध तरुणाची मारहाणीनंतर मेडिकल का करण्यात आली नाही?

3) अरविंद बन्सोड याचा मृत्यू मारहाणीनंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 मे रोजी रुग्णालयात झाला. या कालावधीत त्याचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांनी का घेतला नाही?

4) मयत बौद्ध तरुणाला झालेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर लगेच एफआयआर नोंदवून घेण्याऐवजी थेट मृत्यूनंतरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका जलालखेडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी कोणाचे आदेश आणि दबावाखाली घेतली?

5) या घटनेची/ प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जलालखेडा पोलिसांनी घटना घडल्यानंतर दिली की गुन्हा दाखल केल्यानंतर दिली? त्यानंतर त्यांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावली?

6) बौद्ध तरुणांच्या या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईला फाटा देऊन आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अनवये कारवाई करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर की स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर घेण्यात आला?

7) लगेच जामीन मिळण्यास वाव असलेली कलमे लावण्याची कारवाई करण्याआधी आरोपी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर याला पसार होण्यास रान कोणी मोकळे सोडले?

या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एस आय टी म्हणजे खास तपास पथक मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थापन करण्याची गरज आहे, असे आंबेडकरी लोक संग्रामच्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्याना हे निवेदन प्रा डॉ जी के डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, अच्युत भोईटे, चंद्रकांत जाधव, सतीश डोंगरे,हर्षल शाक्य,पत्रकार विकास साळवे, रमेश मोकळ यांनी पाठवले आहे.
●●●●●●●●●●●●

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वर्तमान सामाजिक परिस्थिती -ऍड प्रवीण पंडित

गुरू जून 11 , 2020
Tweet it Pin it Email वर्तमान सामाजिक परिस्थिती ******************************* ऍड प्रवीण पंडित www.ambedkaree.com ******************************* Pin it Email https://www.ambedkaree.com/20ambedkareeloksangramaboutarvindbansond/#SU1HXzIwMjAwNjE आपल्यावर अन्याय होत आहेत आणि त्या मध्ये संपूर्ण समाज होरपळून निघत आहे. मांग, भटके व बौद्ध यांच्यावर होणारे हल्ले हे सामाजिक द्वेषातून होत आहेत. हा द्वेष आपली झालेली प्रगिती पाहून व आपल्या […]

YOU MAY LIKE ..