“जिंकु शकलो नाही ह्याची खंत आहे, परंतु आम्ही सन्मानजनक मते घेतली.आम्ही 48 जागावर उमेद्वार देउ शकत नव्हतो, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आमचा सैंडविच करणार होती.हे होऊ नये म्हणून आम्ही स्वतंत्र पणे लढलो.वंचित समुहाने मतदान आणि पैसा दोन्ही देऊन हे स्विकारले. पक्ष मान्यता मिलविन्याच्या दिशेने जात आहोत. 23 लाख मते आता पर्यन्त मिळाली आहेत.कांग्रेस संपली आणि वंचितचा उदय झाला. आता आम्ही प्रबळ विरोधी पक्ष आहोत.मनुवादी व्यवस्थे सोबत आता थेट आणि निर्णायक लढा आहे.
अनेक मतदार संघातील एक लाख मते मिळालीय, आमची सर्व तयारी विधानसभा जिंकण्याची तयारी आहे.
Hitler is come back by democracy, त्याला कारण निष्प्रभ विरोधी पक्ष आहेत.आम्ही लोकशाही वाचविन्या साठी लढत होतो आणि कांग्रेस भाजपा ती मर्यादित करत होते।आता दलित मुस्लिम वरील अत्याचार वाढतील ही भीती आहे.
काँग्रेसला कुणीही सोबत नको होते, त्या मुळे कांग्रेस देशभरात काही मोजके अपवाद सोडले तर स्वतंत्र लड़लीय.
आम्ही हे सिद्ध केले की मुस्लिम उमेद्वाराला देखींल वंचित समुहाने मतदान केले.हा वंचित बहुजन आघाडी मुळे शक्य झाले. जे कांग्रेस करू शकले नाही.
सुशील कुमार शिंदे आणि इतर उमेद्वार हे 2014 साली पडलेलेच उमेद्वार आहेत.त्यामुळे आमच्या दृष्टीने ते स्पर्धेत नव्हते. आम्ही ह्या वेळी भाजपा सेना, कांग्रेस राष्ट्रवादी ह्या चार पक्षाचा सोबतच विचारवंत, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रोनिक मीडिया च्या विरोधात देखील लढत होतो.
आमचे लक्ष हे लोकसभा नव्हे तर विधानसभा आहेत.”
एड बाळासाहेब आंबेडकर
23/05/2019