ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगभरात पोहचवले त्याच महामानवांच्या पुतळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये जिजामाता उद्यानात असलेला महामानव डाॅ…बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्री समाज कंटकांनी विटंबना केली.
सदर घटनैचा जाहिर निषेध
खेड अर्थात कोकणात जातीवाद जरी असला तरी त्याचे असे रुप आतापर्यंत पहायला मिळाले नव्हते गेल्या वर्षी लांजा येथे जयंतीचे फलक फाडण्यात आले होते या वर्षी तर चक्क महामानवांचा पुतळाच विटंबित करण्यात आला.
खरे तर कोकणात असे प्रकार घडत नसतात याचा आम्हा कोकण वासियांनाअभि मान असायचा आता मात्र कोकणातील तमाम लोकांची मान शरमेन खाली गेली असेल.
खेड येथिल झालेला प्रकार हा निंदनिय असुन कोकणातिल वजनदार मंत्री मा.रामदास कदम यांच्याच शहरात घडला असुन यांचा त्यांनी विचार करावा.हा
कोकण हे शांत अन सुरक्षित असा गोड समज कोकणातील तमाम आंबेडकरी जनतेला असायचा आणि आता किती धुर धुमसु लागला आहे याची प्रचिती याता येवु लागली आहे. केवळ भावक्यांचे राजकारणात गुंतवुन राहणार्या कोकण्यांनो आता तरी जागे व्हाल हिच आपेक्षा.
सदर प्रकरण घडल्यावर तमाम आंबेडकरी समाज अस्वस्थ असुन निषेधाचे वातावरण जिल्ह्यात पसरले आहे.