क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली.

क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली.

कोरोना महामारीचे राष्ट्रीय संकट यावेळी एप्रिल महिन्यात आल्यामुळे अनेक लोकांना गुरु शिष्याची जयंती साजरी करण्याची संधी मिळणार नाही अशी शंका होती.११ एप्रिल महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले, १४ एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. महापुरुषांची जयंती म्हणजे ठेकेदारी, दलाली,एजंटगिरी,चमचेगिरी करणाऱ्या असा लोकांना भिमजयंती हे सुगीचे दिवस असतात. राजकीय पक्षांनी असे अनेक कार्यकर्ते,नेते विभागा विभागात निर्माण करून ठेवले आहेत.त्यांना यावेळी चेमकेगिरी करण्यास मिळाली नाही.कारण कोरोनांने त्यांचे यावर्षीचे स्वप्न पार धुळीला मिळविले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते जा आपल्या घराच्या भितीवर लिहून ठेवा आम्हाला यादेशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे.

डॉ.बाबासाहेबांचे हे म्हणणं समाजाने कधीच मनावर घेतले नाही आणि मोठया उत्साहात दरवर्षी जयंती साजरी करत राहतात, या वर्षी ही कितवी जयंती आहे?. १२९ वी. विचार करा!.आज पर्यंत राजकीय परिवर्तन का नाही झाले. म्हणजेच आम्ही लायक बापाचे नालायक लेकर आहोत हे सिद्ध करून दाखविले की नाही. गेल्या वर्षी प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने प्रकाशने आम्हाला वंचित बहुजन करून टाकले. सर्व वंचित समाजाच्या लोकांना एकत्र करून यशस्वी राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज झाले होते. लायक बापाच्या नालायक लेकरांनी ती ही सुवर्ण संधी गमावून टाकली.आणि काय सिद्ध केले?.

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमानुसार बदलत राहतो.त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात. वेळ,काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही. म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात. उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठया उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही.म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल, सभागृह बांधण्यात आले आहेत. १९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हते.पण आता समाजाने बदलेलच पाहिजे.आम्ही खेडे सोडुन शहरात आलो,शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन,सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात नाही घडला.खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्या साठी संघर्ष करून झाला. आता स्वतःच्या घरात राहत आहोत.तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्या साठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता.सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता. आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता.

झोपडपट्टी वाचविण्या साठी बुद्ध विहार होती.म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो. बसत होतो,चर्चा करून कार्यक्रम घेत होतो. आता त्यांची गरज वाटत नाही.कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर, लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.त्यामुळेच सर्व आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ला आज एस आर ए बिल्डिंग मध्ये गेले आहेत. म्हणुन एकत्र बसण्याची गरज राहली नाही.आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत. पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत. कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे. म्हणुन एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल. बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल.ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत. आणि विशेष म्हणजे पिणारे खाणारे एकत्र बसू शकतात. सुशिक्षित आणि सुरक्षित नोकरी करणाऱ्यांची इथे गरज नाही. ते असंघटीत समाजाला चालत नाही. कारण ते पित नाही.किंवा तोडपाणी करून खाऊ पिऊ घालत नाही. ते सर्वा कडून सारखी वर्गणी काढण्याची अपेक्षा करतात.

जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो. हीच एकजूट निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?. भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो, पण तो लायटिंग, डेकोरेशन, ब्रेक डांस, कव्वाली वर खर्च करतो. आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो. पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक,आमदार की राजकीय दलालांच्या पाया का पडतो?. असा प्रश्न समाजातील कार्यकर्त्या नेत्यांना का कधी पडत नाही. विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत.त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी, आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाहीत. मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवावी तीच खरी आंबेडकरी विचारांची चळवळ असेल. असे का वाटत नाही.


जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक, आमदार व खासदार आपला येऊ शकतो. लायक बापाच्या नालायक लेकरांनो किती वर्ष भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग कराल?. राजकीय परिवर्तन घडवा. केंद्रात आर एस एस प्रणित सरकार आहे.त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणारा प्रसिद्ध क्रूरकर्मा प्रधानसेवक संविधानिक कोणतेही संकेत न पळता धडाधड निर्णय घेत आहे. जे निर्णय त्याला घेता येत नाही ते सरळ सुप्रीम कोर्टाद्वारे राबविले जात आहेत. त्यांच्याशी राजकीय टक्कर देण्यासाठी आपल्या कडे कोणता राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत.परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?. एकाही नेत्यांचा मतदारसंघ नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?. यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही. वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो, केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला त्याची जागा दाखविली पाहिजे की नाही?. असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना काढून राजकीय दलाली करतात. त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही. आपल्या घरात विषारी जीव,जंतू,जनावर असतील तर त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण उपाय योजना करतो की नाही.साठ वर्षात आंबेडकरी चळवळीतील बालेकिल्ला मतदारसंघ नष्ट होत चालले त्यांचा बंदोबस्त कोण करेल?. बहुजन समाजाने यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की बहुजन समाजातील लोकांचे काय?. कार्यकर्ते, नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात,आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेला पक्ष सर्व आघाड्यावर मात करीत आहे. केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था, संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो. म्हणूनच लायक बापाच्या नालायक लेकरांनो वैचारिक शत्रूच्या उमेदवारा कडून लाखो रुपये घेऊन जयंती साजरी करण्याचे ढोंग बंद झाले पाहिजे.

कोरोनाचे महासंकट देशावर असतांना भिमजयंती कशी साजरी होणार ही सरकार समोरची मोठी समस्या होती. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार यांची पोलिसांना भीती होती.याची सर्वात मोठी जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता,नेत्यांची आणि समाजाची होती,ती त्यांनी अतिशय जबाबदारी ने पार पडली म्हणून आज त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नांवाचा आपण नियमितपणे जयजयकार करतो. त्यांच्याच संविधानामुळे आज देशात कोरोनाचा मुकाबला प्रशासन प्रशासकीय व्यवस्था काम करीत आहे. अन्यता प्रचंड हाहाकार माजला असता. आज पोलिस,डॉक्टर,नर्स,पालिका कामगार कर्मचारी जीव धोक्यात घालून जनतेला सेवा देत आहेत. त्यांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहण्याची जबबदारी खऱ्या अर्थाने भीमसैनिकांची होती ती त्यांनी शंभर टक्के यशस्वी करून दाखविली. म्हणूनच या वर्षी घरात परिवारा सोबत शांततेत भिम जयंती साजरी करणार आणि करोनाला हरवणार अशी घेतलेली भिम प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण करून दाखविली.

राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी वैचारिक विचारांची जयंती साजरी करण्यात येईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. भिम जयंतीनिमित्त नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे कोणी म्हणणार नाही.कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार,मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो. नेहमी तिरस्कार करणाऱ्या लोकात आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून प्रचंड अस्वस्थता वाढते असते. आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंत च्या जयंतीत आपण पाहिले आहे. आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणताही ठोस कृती कार्यक्रम, योजना नाही. व्यक्ती पूजा मूर्ती पूजा करून आपण किती वर्ष जयंती साजरी करत राहिलो तर क्रांतिकारी विचारांचे काय?. तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग आहे की नाही?. यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. घराघरात भिम जयंती साजरी करून ती संघ शक्ती आपण दाखवून दिली.म्हणूनच १२९ व्या भिमजयंती ची नोंद इतिहासात वेगळ्या पद्धतीने लिहली जाईल.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक विचारांना कोटी कोटी प्रणाम करून घराघरात भिम जयंती साजरी झाली त्यामुळेच हा आंबेडकरी समाज अभिनंदनास पात्र आहे.सर्वच भीमसैनिकास मानाचा मुजरा व क्रांतिकारी जयभिम

आयु.सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भांडुप,मुंबई

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट... = प्रकाश आंबेडकर

शनी एप्रिल 18 , 2020
Tweet it Pin it Email आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट… = प्रकाश आंबेडकर ========================== Pin it Email https://www.ambedkaree.com/sagartayadeaboutbhimjayanti/#RkJfSU1HXzE1ODY आम्ही, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील लोक, डॉ. आनंद तेलतुंबडे, जे १९८३ पासून आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, त्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाने चिंतीत आहोत. जेव्हा ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे […]

YOU MAY LIKE ..