सरकार आम्हीपण माणसंच आहोत ना ? पूरग्रस्त मागासवर्गीय वस्त्यांचा आर्त टाहो ! सांगलीतील पलूसपासून अवघ्या बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर भिलवडी हे कृष्णा नदीकाठी वसलेलं गांव आहे. येथील हजारो मागासवर्गीयांची महापुराने अक्षरशः दाणादाण उडवलीय. सारंकाही होत्याचे नव्हतं केलंय. तिथल्या कुठल्याही पुरग्रस्ताला काही विचारलं तर त्याच्या तोंडातून शब्द फुटण्यापूर्वी अश्रू ढळताहेत. […]