ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पूरग्रस्त “ब्रम्हनाळ” गाव दत्तक घेतले

महाराष्ट्रात पूरस्थिती आहे ….!पाणी ओसरत आहे मात्र पुरात सर्व काहीं गेले होत्याचे नव्हते झाले,संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली होता . लोक मदतीचे याचना करत आहेत .पूरग्रस्तांना जात ,धर्म न पाहता मदत केली पाहिजे .
सुरवातीला सरकारी यंत्रणा सक्रिय नव्हती परिस्थितीची जान झाल्यावर मात्र सत्ताधारी हादरले .माध्यमांशी लोकप्रतिनिधी ही घाबरून व वाचाकून आहेत.


त्यातच विविध सामाजिक संस्था , धार्मिक संस्था आणि सर्वच स्थरावर लोक मदत करत आहेत अशा स्थितीत महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे.आपल्या पूर दौरा करीत सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. ते गाव त्यानीं दत्तक घेतले. या संदर्भात त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे .

जे सत्ताधारी पक्षांना जमले नाही ते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी करून दाखवले आपली जबाबदारी ही सर्वसामान्य जनतेशी आहे .त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण्यांना एक दाखला दिलाय.

करोडो मालमत्तेचे मालक असलेले पश्चिम महाराष्टात राजकारणी आपल्या संपत्ती चे संवर्धन करण्यात गुंग असलेले असताना ऍड आंबेडकर यांनी नवा आदर्श निर्माण केलाय.

पुरग्रस्त “ब्रम्हनाळ” गाव दत्तक घेतले…

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.
पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

ब्रम्हनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गांव देत आहोत असं जाहीर केले आहे.

1. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.

2. 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.
3. गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.
4. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.
5. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.

6. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

15 AUGUST ........REALTY.......! वास्तव

गुरू ऑगस्ट 15 , 2019
Tweet it Pin it Email मॉब लिंचिंग मध्ये निर्घृण पणे हत्या झालेल्या हरियाणाच्या पहलू खानचे मारेकरी काल निर्दोष सुटले… त्याआधी डॉ. पायल तडवीचे मारेकरी ही मोकळे सुटले.. तिकडे आपले लाखो निरपराध काश्मिरी बांधव पिंजऱ्यात बंद आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या वर कर्फ्यु लावून आणि त्यांचे मीडिया, इंटरनेट कनेक्शन्स सर्व काही […]

YOU MAY LIKE ..